Posts

Showing posts from March 30, 2024

समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारी गोर बंजारा होळी - डॉ. सुभाष राठोड

◆ समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारी गोर बंजारा होळी       प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे      पुरातन काळापासून रान-माळात, डोंगर – दऱ्याखोऱ्यांत, गिरी-कंदरात वस्ती करून राहणारा, मेहनती, काटक या गुण वैशिष्ट्यांनी आपले जीवन आबादी आबाद करणारा गोर बंजारा समाज यांची ‘गोर संस्कृती’ ही जगावेगळी आहे. त्यांचे जीवनच मुळात नित्य – नैमित्तिक सण – उत्सवांनी पुरेपूर भरलेले आहे. नृत्य – संगीत हा त्यांचा स्वभाव धर्म आहे. कोणाचे मनोरंजन किंवा करमणूक करण्यासाठी त्यांचे हे सांस्कृतिक आविष्कार आविष्कृत होत नसून त्यांच्या जीवन जगण्याचाच तो एक स्थायीभाव, अविभाज्य भाग आहे. आपल्या समाजात जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक घटनेला संस्कार, विधी आहेत आणि प्रत्येक सण – समारंभ, विधी, संस्कारांच्या वेळी नृत्य, गीत – संगीत आहेच ! गोर बंजारा समाजाच्या होळीच्या उत्सवात, बंजारा समाजाच्या प्रथा, रूढी आणि, परंपरांचे सांस्कृतिक दर्शन घडते.‌      गोर – बंजारा समाजाचा होलिकोत्सव हा एक जणू आनंदोत्सवच ! मानवी नात्याची वीण घट्ट करणारा, प्रेम आणि आनंदाची मुक्तहस्ते उधळण करणारा सण म्हणजे होळी स...

महाराष्ट्र शासनाद्वारे संस्कृत, तेलगू, बंगाली व गोल बंजारा साहित्य अकादमीची स्थापना

महाराष्ट्र राज्य संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा साहित्य अकादमीची स्थापना करणेबाबत शासनाची मान्यता - डॉ. सुभाष राठोड, पुणे महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. १६ मार्च २०२४ परिपत्रकानुसार संस्कृत, तेलुगू, बंगाली व गोर बंजारा साहित्य अकादमीची स्थापना करणेबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आहे. (शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण -8223/ प्र.क्र. ११९/सां .का.4 - मंत्रालय मुंबई - दि. १६-०३-२०२४ ) महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठी भाषेला अधिक समृध्द करण्यासाठी विविध स्तरांवरुन प्रयत्न केले जातात. बहुभाषकांच्या या महाराष्ट्रात इतर भाषेतील साहित्य कृतींची भर पडावी या उद्देशाने इतर भाषेंच्या साहित्य अकादमीची स्थापना हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. राज्यामध्ये तेलुगू आणि बंगाली भाषिकांचे वास्तव्यही असून त्यांच्याकडून तेलुगू आणि बंगाली साहित्य अकादमीची स्थापना करण्याची सातत्याने मागणी होत होती. तद्वत: गोर बंजारा भाषिकांची देखील मोठी लोकसंख्या राज्यामध्ये असल्याने गोर बंजारा भाषेची देखील स्वतंत्र अकादमीची मागणी होत होती. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य ग...

संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजना :

Image
संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजना :      आजही महाराष्ट्रातील सुमारे २० ते २५ लाख बंजारा-लमाण समाजाचा अपेक्षित विकास झालेला नाही. या समाजाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणून त्याचे राहणीमान उंचावणे, उत्पन्नाचे स्रोत वाढावेत आणि स्थिरता प्राप्त करून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे.   योजनेचा उद्देश :     राज्यातील बंजारा आणि लमाण समाजाच्या तांड्यांमध्ये मूलभूत सुविधा आणि विकासासाठी प्रोत्साहन देणे. योजनेची वैशिष्ट्ये : ● तांड्यांना गावठाण आणि महसूल गावचा दर्जा देणे.  ● स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी अंतराची अट शिथिल करणे. ● प्रत्येक तांड्याला ३० लाख रुपये पर्यंत निधी उपलब्ध करून देणे. ● पाणीपुरवठा, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता इत्यादी सुविधांसाठी निधी. ● तांड्यांमधील तरुणांसाठी कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती कार्यक्रम. ● बंजारा आणि लमाण समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन. योजनेचा लाभ :   ...