Posts

◆ प्रा.पी.टी.चव्हाण : भटके-विमुक्त व ओबीसींचा बुलंद आवाज !

Image
◆ प्रा. पी. टी.चव्हाण : भटके, विमुक्त व ओबीसींचा बुलंद आवाज !          सामान्यातून असामान्य झालेल्या परंतु सतत सामान्यांची काळजी वाहणारे विमुक्त – भटके,ओबीसी,उपेक्षित, वंचितांचे संघर्षिल व धाडसी नेते, आपल्या अनोख्या कार्यशैलीचा वेगळ्या प्रकारे जनमानसात ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक धडाडीचे तथा उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.पी.टी.चव्हाण सर.. वाडी वस्ती तांडे,पाडे, पालनिवासी,दुर्लक्षित,वंचित, निराधार, बहुजन व भटक्या – विमुक्तांच्याप्रती अत्यंत संवेदनशील असलेले प्रा.पी.टी. चव्हाण हे महाराष्ट्रातील एक समाजमान्य सर्वश्रुत नेते आहेत. जनमानसातील त्यांची ओळख. तसेच ‘भटके विमुक्त व बहुजन बांधवांचे नेते’ अशीच त्यांची खरी ओळख. कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व व परिश्रमाच़्या बळावर जनमाकेनसात आपल्या कार्याचा ठसा उमटवता येऊ शकतो या विचारावर गाढ श्रद्धा असलेले, त्यासाठी सायास करावे लागतात. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे !’ ही समर्थांनी दासबोधात सांगितलेली उक्ती प्रा. पी. टी. चव्हाण सरांच्या बाबतीत सार्थ ठरते. कोणतीही चळवळ ही निःस्वार्थी हेतूने उभारलेली असावी.ती जनह...

AI क्रांती : नवीन जगाचा उदय - डॉ. सुभाष राठोड

Image
  कृत्रिम बुद्धिमत्ता  AI   क्रांती : नवीन जगाचा उदय                                                              ⋄   प्रा . डॉ. सुभाष राठोड , पुणे    या पृथ्वीतलावर केवळ मनुष्यच असा प्राणी आहे, की जो इतर प्राण्यांच्या तुलनेत बुद्धिमान समजला जातो. ज्या प्राण्यांमध्ये किंवा मनुष्यांमध्ये विचार करण्याची क्षमता असते त्यांना बुद्धिमान म्हटले जाते. अनेक प्राण्यांमध्ये बुद्धिमत्तेचे लक्षणे दिसून येतात, परंतु विवेकबुद्धी हा गुण केवळ मनुष्यामध्येच आढळतो म्हणून  मनुष्य बुद्धिमान समजला जातो.  आजच्या काळात तंत्रज्ञानाने अतोनात प्रगती केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या तंत्रज्ञानाचा उदय झाला आहे. आजच्या युगात, तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अनेक क्षेत्रात प्रगती झाली आहे, तरीही अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आपल्या जीवनात सुधार...

गुरुपौर्णिमा : ज्ञानाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव ! - डॉ. सुभाष राठोड, पुणे

Image
                                                                     21 जुलै 2024 – गुरुपौर्णिमा विशेष गुरुपौर्णिमा : ज्ञानाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव          ◆ प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे  “गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः।  गुरु साक्षात् परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः।।“      आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी ‘गुरुपौर्णिमा’ हा उत्सव साजरा केला जातो. जो ‘व्यास पौर्णिमा’ म्हणूनही ओळखला जातो. गुरु पौर्णिमा ऋषी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरी केली जाते, या दिवशी, महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते. ते हिंदू धर्मातील सर्वात महान गुरुंपैकी आद्यगुरू मानले जातात. त्यांनी महाभारत, वेदांची सूत्रबद्ध विभागणी, ब्रम्हसूत्रे, आणि अनेक पुराणे लिहिली असे मानले जाते. गुरुचे आपल्या जीवनात महत्त्व आजही अ...
Image
  ◆  नवमहाराष्ट्राचे शिल्पकार : वसंतराव नाईक           प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे     आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या थोर शिल्पकारांची नावे इतिहासाच्या सुवर्ण पटलावर कोरली गेलेली आहेत, त्यात स्वतंत्र महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. १ जुलै ही त्यांची जयंती ‘कृषिदिन’ म्हणून साजरी केली जाते.स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र घडविणारे महत्वाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या नावाचा अग्रक्रमाने उल्लेख केला जातो. आज महाराष्ट्राची जो काही जडणघडण झाली आहे, त्यामध्ये सदरील मुख्यमंत्र्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. नाईक हे महाराष्ट्रातील हरितक्रांती, पंचायतराज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजना यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचे प्रवर्तक मानले जातात. या महनीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याला खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम केले आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी “वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत.” या ...

● समतेचे दीपस्तंभ : राजर्षी शाहू महाराज - डॉ. सुभाष राठोड

Image
    २६ जुलै - छत्रपती शाहू महाराज जयंती विशेष.. समतेचे दीपस्तंभ : छत्रपती शाहू महाराज                                          ● प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे           महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, समतेचे अग्रणी, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, अस्पृश्यांचे उद्धारक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे उत्तराधिकारी, दूरदृष्टीवान शासक, थोर समाजसुधारक, युगपुरुष शिक्षणप्रेमी आणि दलित-शोषितांचे कैवारी, स्त्री-पुरुष समानतेचे समर्थक, समाज परिवर्तनाचे अग्रदूत, क्रांतिकारी राजे, त्यांच्या कार्याचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव पडला आहे असे थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांची २६ जुलै रोजी जयंती साजरी केली जाते. जयंतीनिमित्त त्यांचे महान विचार व कार्यास विनम्र अभिवादन ! महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे आपल्या राज्यास ‘फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र’ असे संबोधले जाते.     राजर्षी ...

● जलक्रांतीचे जनक : सुधाकरराव नाईक - डॉ. सुभाष राठोड, पुणे

Image
 ● १० मे - जलसंधारण दिन विशेष  जलक्रांतीचे जनक : सुधाकरराव नाईक                     ©     डॉ. सुभाष राठोड, पुणे    महाराष्ट्र राज्याचे १३ वे मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल पद भूषविलेल्या सुधाकरराव नाईक यांचा आज १० मे स्मृतिदिन, स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन !    बाणेदार आणि पाणीदार नेता अशी आजही जनमानसात ओळख असलेल्या माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा अगदी गावाच्या सरपंचापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल पर्यंतचा राजकीय प्रवास अतिशय रंजक व उद्बोधक आहे. २५ जून, १९९१ ते २२ फेब्रुवारी, १९९३ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे ते पुतणे असून *'जलक्रांतीचे जनक'* म्हणून सुधाकरराव नाईक ओळखले जातात. ते अल्पकाळच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते परंतु त्यांच्या अल्पशा कार्यकाळात त्यांनी राज्याच्या हितासाठी केलेली अनेक लोककल्याणकारी कामे अत्यंत महत्त्वाची आहेत.    ...

गोरबंजारा समाजाची काशी - पोहरा देवी - डॉ. सुभाष राठोड

Image
  गोरबंजारा समाजाची काशी - पोहरा देवी “थाळी नंगाराच्या निनादाने दुमदुमते अवघी पोहरानगरी !   महाभोग , महाआरती , आरदासाच्या पवित्र सुराने गजबजते बंजारा काशी !”         संपूर्ण भारतातील गोर - बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले ‘तीर्थक्षेत्र पोहरादेवी’ हे ‘गोर-बंजारा समाजाची काशी’ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे . हे तीर्थक्षेत्र भारतीय गोर - बंजारा समाजात अजरामर झालेले असून येथे दरवर्षी रामनवमी , नवरात्रात मिळून वर्षाकाठी चार वेळा भव्य यात्रा भरते . येथे जगदंबा देवीचे भव्य मंदिर असून गोर - बंजारा समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे महापुरुष संत सेवालाल महाराज यांची पोहरादेवी येथे समाधी आहे . जगदंबा देवी , संत सेवालाल महाराज , सामकी   माता , संत रामराव महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या या तीर्थस्थळी देशभरातून भाविक दरवर्षी मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी , नवस फेडण्यासाठी येत असतात .‌ महाराष्ट्राबरोबरच आंध्र , तेलंगणा , कर्नाटक , राजस्थान , मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश , गुजरात व भारतातील इतर राज्यातून लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी नित्यनेम...